महाराष्ट्राची नव्हे तर देशाची रक्षण करण्याची प्रेरणादायी शपथ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्ती सैन्यात सहभागी होत असतात,महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं सैनिकांचे गाव म्हणून सैनिक टाकळीला ओळखले जाते.येथील कन्या सौ.वैष्णवी पाटील, आपल्या गावाच्या सैनिकी परंपरेचा अभिमान जपत आपला ज्या गावात जन्म झाला त्या गावासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत. पुराणकालीन तळ्याचे सुशोभीकरण करून गावासाठी आदर्श निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.त्या निसर्गप्रेमी असून पर्यावरणपूरक संवर्धनासाठी सातत्याने वृक्षारोपणाचे कार्यही करत आहेत. गाव हिरवेगार, स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी त्या विविध ठिकाणी झाडे लावून पर्यावरणाचा संदेश देत आहेत.
त्यांचा पुढील संकल्प म्हणजे या तळ्याची खुदाई करून गाळ काढणे त्यामध्ये पाण्याचा साठा निर्माण क्षमता वाढविणे,, तसेच तळ्याच्या चारी बाजूंनी सुंदर वॉकिंग ट्रॅक तयार करणे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गावातील नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी आणि आनंदाचा विरंगुळा मिळण्यासाठी एक सुंदर नैसर्गिक ठिकाण निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
तळे आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे — कृपया त्या ठिकाणी कचरा टाकू नका तसेच परिसर अस्वच्छ होईल असे कोणतेही कृत्य करू नका. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाने थोडासा वेळ काढून त्या परिसरावर लक्ष ठेवावे. जर कोणी कचरा टाकताना किंवा परिसर घाण करणारी कोणतीही कृती करताना दिसले, तर त्यांना समज देऊन थांबवावे.
आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे हे सुंदर कार्य दीर्घकाळ टिकून राहील.
सध्या त्या परिसरात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गावातील लहानांपासून – थोरांपर्यंत प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी. तेथील सुरू असलेले परिवर्तनिय बद्दलाचा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की सैनिक टाकळीच्या या कन्येने आपल्या गावासाठीआणि गावकऱ्यांसाठी किती मोठे प्रेरणादायी कार्य हाती घेतले आहे.
“एक गाव, एक ध्येय” या भावनेतून आपण सर्वांनी एकत्र येऊन तळे स्वच्छता, वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाच्या कामात सहभागी होऊया.
आपल्या सहकार्यामुळे सैनिक टाकळी गाव संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल.






