• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील साकत परिसरात सोमवारी दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा धक्का लागून बैलगाडीतील दोन बैल जागीच ठार झाले. सुदैवाने बैलगाडीतील पाच शेतकरी थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

RelatedPosts

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, साकत परिसरातील शेतकरी संभाजी वराट हे आपल्या कुटुंबासह बैलगाडीतून शेताकडे जात होते. बैलगाडीत पाच जण प्रवास करत होते. दरम्यान, रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या जिवंत वीजवाहिनीवरून बैलगाडी गेल्याने बैलांना जोरदार विजेचा धक्का बसला.

वीजप्रवाह सुरू असल्यामुळे दोन्ही बैल जागीच मृत झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाडीत बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र प्रसंगावधान राखल्यामुळे बैलगाडीतील सर्वजण सुरक्षित बाहेर पडले आणि मोठा अनर्थ टळला.

या दुर्घटनेत संभाजी वराट यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलांची जोडी गेल्याने संबंधित शेतकरी कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे साकत परिसरासह संपूर्ण जामखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रस्त्यावर जिवंत विजेची तार पडलेली असताना महावितरण प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पीडित शेतकरी कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Previous Post

मारेगाव, पोलिसांची मोठी कारवाई. दोन वाहने जप्त तीन आरोपींना अटक

Next Post

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Related Posts

ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
24
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
21
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
6
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
16
नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव
ताज्या घडामोडी

नंदुरबारची शान! ७ वर्षीय प्रनिका पाटीलचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात गौरव

July 12, 2026
4
Next Post

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

ताज्या बातम्या

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026

‘आपल्या शरीरावर आपलाच हक्क’; किशोरवयीन मुलींना सुरक्षिततेचे मार्गदर्शन

July 12, 2026
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In