• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

सहा महिन्यांपासून रखडलेले काम अद्याप अपूर्ण; पावसाळ्यात वाहतुकीची भीती

धारणी / प्रतिनिधी

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कुटंगा ते बैरागड या महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असले तरी अद्यापही ते अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रस्त्याचे काम रखडल्यामुळे पहिल्याच पावसात या मार्गाची दुरवस्था होऊन वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी कुटंगा आणि बैरागड येथील ग्रामस्थांनी केली आहे.

माहितीनुसार, कुटंगा ते बैरागड या मुख्य रस्त्याच्या कामाला सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या संथ कारभारामुळे हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहे.

हा रस्ता परिसरातील अनेक गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खडी पसरलेली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर या अर्धवट रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

विशेषतः रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवा या मार्गावर अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदाराला काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Rajanshil Sakle
Previous Post

पत्नीच्या नातेवाईकांवर सरसकट गुन्हे दाखल करू नयेत : सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Next Post

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In