प्रतिनिधी :- शशिकांत जरांगे आष्टी
श्री शंभुकलश काव्यसंस्था व सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे श्री शंभुकलश काव्यकरंडक स्पर्धा व दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन २०२६ अहिल्यानगर येथे दि.३१ मे रोजी पार पडणार असून,
या संमेलनासाठी उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्री अनंत कराड, संमेलनाध्यक्ष श्री नितीन चंदनशिवे (दंगलकार), स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुनिल शिंदे सर, तसेच प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ साहित्यिक श्री सुनील गोसावी, चित्रपट दिग्दर्शक, गितकार श्री अनिलकुमार बा होळकर, जेष्ट साहित्यिक डॉ कैलास दौंड,
प्रा. सुरेश वाळेकर लाभले आहेत, संस्थेचे अध्यक्ष कवी महादेव लांडगे , उपाध्यक्ष कवी बाळासाहेब घोरपडे, संस्थेचे संघटक कवी विश्वेश्वर बोडखे, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अक्षय विधाते या सर्वांच्या उपस्थितीत संस्थेचे दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन भव्य स्वरुपात पार पडणार असून संमेलनाचे ठिकाण माऊली सांस्कृतिक भवन टिळक रोड हॉटेल नंदनवन जवळ, अहिल्यानगर, येथे असून श्रीशंभुकलशांचा साहित्याचा वारसा जपताना मायमराठीच्या सेवेसाठी सर्व कवींना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या भव्य राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले आहे असे कार्याध्यक्ष अनिकेत अवसरमल तसेच युवा कवी व संस्थेचे संस्थापक सचिव संदिप पाचारणे यांनी सांगितले आहे.




