ग्रामीण भागात करण्यात कलेल्या भारनियमनच्या वेळेत बदल करा
” भारनियमना मुळे ग्रामीण नागरिकांचे हाल”
प्रतिनिधी.
ग्रामीण भागात करण्यात आलेले भारनियमन चुकीचे असून भारनियमनच्या वेळेत महावितरणने तात्काळ बदल करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचा वतीने करण्यात आली आहे. उन्हाचा पारा वाढत जात असल्यामुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे त्यात ग्रामीण भागातील विज विद्युत पुरवठा रात्री ७ ते १० या वेळेत बंद असल्यामुळे लहान मुलां सह वयोवृध मंडळी, शेतात दिवसभर काम करून महिला माता भगिनी यांना अंधारात गर्मीचा नाहक त्रास सहन करुन स्वयंपाक करावा लागतो तर काहीं ची प्रकृती चिंताजनक असल्याने रात्री लाईट पुरवठा बंद असल्या कारणाने यांना उष्मघाताचा भयंकर त्रास सहन करावा लागतो यांच्या आरोग्यास जिवीतास धोका निर्माण होत आहे.
तरी संबंधीत विज विद्युत वितरण कार्यालय यांनी रात्रीच्या वेळेस विज विद्युत पुरवठा सुरु ठेवून सहकार्य करावे तसेच शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात भार कमी असतो याचा विचार करून भारनियमच्या वेळेत बदल करावा अन्यथा विज विद्युत वितरण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी राज्य ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री यांना जिल्हाभरात फिरणं मुश्कील होईल असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला भावनांचा उद्रेक झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नामदेव काळे, गोपाळराव काळे, दत्तराव परांडे, लक्ष्मण शिंदे, अशोकराव कदम, दत्तराव काळे, बंडू भाऊ तुरे यांच्या सह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










