नारायणगाव दि. ३० (वार्ताहर प्रशांत माने) =राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र सचिव सुरेश काकाणी यांनी दिनांक २६ मे २०२६ रोजी काढलेल्या पत्रकान्वये जाहीर केला आहे.
राज्यातील सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या रचनेसाठी ग्रामविकास विभागाने दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या प्रभाग रचना कार्यक्रमानुसार दि.
आरक्षण सोडत खालील प्रमाणे
८ जून-आरक्षण सोडत काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना देणे, १२ जून-विशेष ग्रामसभेचे आयोजन करून आरक्षणाची सोडत काढणे, १७ जून- प्रभाग निहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १९ जून-प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे, १९ जून ते २५ जून-आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणे, ३ जुलै उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे, ८ जुलै-उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे, १० जुलै जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे
२८ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग रचनेची अंतिम मान्यता होऊन प्रभाग रचनेस दि. ४ मे २०२६ रोजी व्यापक प्रसिद्धी देण्यात
आली आहे. त्यानुसार १४ हजार ३१४ ग्रामपंचायतचे प्रभाग रचना पूर्ण झाल्याचे ग्राम विकास विभागाने कळविले आहे.





