करमाळा प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे कंदर येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजप गट नेत्या रश्मी बागल व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय भैय्या बागल यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भाजप नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते सुमारे ५४ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
गावातील रस्ते, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये श्री दत्त वजन काटा ते जाधव वस्ती रस्ता (७ लाख रुपये), सावंत वस्ती ते पराडे वस्ती रस्ता (६ लाख रुपये), जिल्हा परिषद शाळा ते माने वस्ती रस्ता (७ लाख रुपये), श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे भूमिगत गटार बांधकाम (१४ लाख रुपये), सिमेंट काँक्रिट रस्ता (७ लाख रुपये), स्ट्रीट लाईट पोल शिफ्टिंग (१ लाख रुपये), विद्युतीकरण (६ लाख रुपये) तसेच श्रीराम मंदिर परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण (३ लाख रुपये) या कामांचा समावेश आहे.
या विकासकामांमुळे गावातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक, स्वच्छता व मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना दिग्विजय भैय्या बागल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि पालकमंत्री Jaykumar Gore यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील लोकहिताची विकासकामे सातत्याने राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच भविष्यातही विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश नीळ, कल्याण सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, संचालक कुलदीप पाटील, सरपंच मौला मुलाणी, पोलीस निरीक्षक भगत मॅडम, तंटामुक्त समिती अध्यक्ष नानासाहेब लोकरे, अरुण सरडे, मारुती यादव, महावीर तळेकर, रवी जाधव, गोरख जगदाळे, तानाजी देशमुख, दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब पराडे, सुभाष पवार, रावसाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य नितीन तकीक, डॉ. विजय रोकडे, विष्णु माने, आबा लोकरे, राजकुमार सरडे, बाळासाहेब घाडगे, संतोष माने, धर्मराज लोकरे यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान दिग्विजय भैय्या बागल यांचा सत्कार सरपंच मौला मुलाणी व कार्यक्रमाचे संयोजक रंगनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी मानले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणाऱ्या या विकासकामांमुळे कंदर गावाच्या प्रगतीला नवी गती मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.






