कुरुंदवाड | प्रतिनिधी :
शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे शांतीब्रह्म संतश्रेष्ठ Sant Eknath Maharaj यांचे नातू Sant Kavi Mukteshwar Maharaj यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या संजीवन समाधीस्थळी आयोजित करण्यात आलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात सुरू असून परिसरातील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गुरुवार दि. ११ जून २०२६ पासून सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवार दि. १९ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन सद्गुरू Anna Maharaj Abdul Lat व Vivekanandji Vaskar Maharaj यांच्या आशीर्वादाने, तसेच गुरुवर्य Ranoji Malak, Mahadev Maharaj आणि Raju Maharaj Abdul Lat यांच्या प्रेरणेने होत आहे. या उपक्रमासाठी Aditya Inamdar व Devendra Inamdar यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पारायण सोहळ्याचे व्यासपीठ संचालन Dhondiram Ghorpade, Vilas Shiradhone आणि Subhash Koli हे करत आहेत. सप्ताहादरम्यान दररोज हरिपाठ, प्रवचन तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहाची सांगता शुक्रवार दि. १९ जून रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार असून हे कीर्तन ह.भ.प. Vivek Bhaskar Mule (अब्दुललाट) यांच्या सुमधुर वाणीतील कीर्तनाने संपन्न होईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास Dr. Rajendra Patil-Yadravkar, Dhairyasheel Mane, Dr. Ashokrao Mane, Shankar Devaji Mama यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच Sanjay Patil-Yadravkar, Shraddha Gaikwad, Manisha Dange, Milind Kurane, Amarsingh Mane आणि Deepak Gaikwad यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी Yuvraj Patil, Tukaram Madyapgol, Vishal Koli, Appaso Patil, Shrishail Mathpati यांच्यासह ग्रामस्थ, तरुण मंडळे, विविध सहकारी संस्था, दूध संस्था, पतसंस्था आणि शालेय शिक्षण समितीचे सदस्य Suraj Kamble, Sujata Aivale, Prashant Gaikwad, Ramzan Jamadar, Najuka Patil, Priyanka Yamgar, Sharmila Kamble, Ashwini Chaudhari तसेच संपर्कप्रमुख विलास यांचे विशेष योगदान लाभत आहे.
या सप्ताहादरम्यान परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून संपूर्ण तेरवाड परिसर हरिनामाच्या गजराने आणि भक्तिरसाने न्हाऊन निघाला आहे. या पारायण सोहळ्याचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक Yuvraj Patil यांनी केले आहे.
