खटाव प्रतिनिधी :
“स्वच्छ भारत, निरोगी भारत” तसेच स्वच्छता ही सेवा 2026 अभियानांतर्गत आज मान-खटाव विधानसभा मतदारसंघातील वडूज (ता. खटाव) येथे विशेष स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. यावेळी एसटी स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला पुढे नेत, “स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून राष्ट्रसेवेचे प्रभावी माध्यम आहे,” असा संदेश उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिला.
स्वच्छ, सुंदर आणि निरोगी परिसर घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. अभियानादरम्यान नागरिक, कार्यकर्ते आणि स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
या उपक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी, सातारा जिल्हा भाजप सरचिटणीस विकल्प शेख, वडूज नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, गटविकास अधिकारी योगेश कदम, वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, भाजप शहराध्यक्ष प्रदीप शेटे यांच्यासह नगरसेवक, कर्मचारी आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले.
