• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणच्या मनमानीविरोधात मांचीहिल फाट्यावर रास्ता रोकोचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

निमगाव जाळी | वार्ताहार

आश्वी, जोर्वे व परिसरातील शेतकरी आणि वीजग्राहक गेल्या चार ते पाच महिन्यांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झाले असून, कृषीपंप व गावठाण वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली वीज पूर्ण वेळ आणि पूर्ण दाबाने मिळत नसल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

महावितरणकडून शेतीसाठी दररोज सहा तास वीजपुरवठ्याचे नियोजन असले तरी प्रत्यक्षात वारंवार फॉल्ट, कमी दाब आणि तासन्तास वीजपुरवठा खंडित राहण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. भर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध असूनही वीजअभावी पिके वाळत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत अनेकवेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. तसेच राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला. विविध कार्यकर्त्यांनी जनसेवा कार्यालयामार्फत निवेदने देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी पंचायत समिती सदस्य श्री. सरूनाथ उंबरकर यांनी आश्वी व जोर्वे परिसरातील सर्व शेतकरी, वीजग्राहक आणि नागरिकांना पक्ष, गट, तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

“चार ते पाच दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, कृषीपंपांना पूर्ण दाबाने किमान ८ तास व गावठाणला २४ तास नियमित वीजपुरवठा झाला नाही, तर दि. १ जुलै २०२६ रोजी मांचीहिल फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा श्री. उंबरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

आंदोलनासंदर्भातील पुढील सूचना वेळोवेळी कळविण्यात येणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

लोणी-धामणी परिसरात पावसाची दमदार हजेरी; शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post

महाळुंगे वाहतूक विभागाचा अभिनव जनजागृती उपक्रम; नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

महाळुंगे वाहतूक विभागाचा अभिनव जनजागृती उपक्रम; नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In