अंबरनाथ | प्रतिनिधी
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी यांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
आज सकाळपासून अंबरनाथ शहरात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासन सतर्क झाले आहे.
