गुडाळवाडी, दि. १५ ऑगस्ट २०२६ : विद्या मंदिर गुडाळवाडी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारी प्रेरणादायी भाषणे केली. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भाषण स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एन. पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्य, देशप्रेम, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मोरे मॅडम यांनी केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.






