सारथी महाराष्ट्राचा | सोलापूर प्रतिनिधी
“लोकशाहीत जनतेचे प्रश्न हेच ज्यांचे अंतिम ध्येय असते, तोच खरा लोकनेता असतो,” याची प्रचिती पुन्हा एकदा अकलूजमध्ये पाहायला मिळाली. अकलूज शहर आणि परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारे महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूजमधील गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष वेधले आहे.
अकलूज परिसरात निर्माण झालेल्या पाणी समस्येच्या पार्श्वभूमीवर किरण साठे यांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता श्री. मोरे यांच्याशी थेट संवाद साधून नागरिकांसाठी पाणी सोडण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, किरण साठे हे केवळ प्रश्न मांडून थांबत नाहीत, तर ते मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करतात. दिवस असो वा रात्र, जनतेच्या अडचणींसाठी तत्परतेने धावून जाणे हीच त्यांची कार्यपद्धती असल्याचे नागरिक सांगतात.
प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट समन्वय साधून प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या शैलीमुळे अकलूज परिसरातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अडचणीच्या काळात किरण साहेब नेहमीच पाठीशी उभे राहतात,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
अकलूजच्या पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर वेळेत पुढाकार घेतल्याबद्दल नागरिकांकडून किरण साठे यांच्या कार्याचे कौतुक केले जात असून, जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे.
