पातूर | प्रतिनिधी
आलेगाव येथील वैष्णवी रुषिकेष गिर्ह यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने ₹5 हजारांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनच्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या त्या आलेगावमधील पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत.

वैष्णवी गिर्ह यांनी काही महिन्यांपूर्वी फाऊंडेशनचे ₹250 सभासदत्व स्वीकारले होते. त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने फाऊंडेशनच्या नियमांनुसार कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ₹5 हजारांच्या आर्थिक सहाय्याचा लाभ त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनच्या अमरावती महिला विभागीय अध्यक्ष तथा अकोला जिल्हा अध्यक्षा सौ. वर्षाताई संजय बगाडे, पातूर तालुका अध्यक्ष रविकुमार आर. तायडे, पातूर महिला तालुका अध्यक्षा सौ. आरतीताई पुजेश गोळे तसेच केंद्र प्रमुख उपस्थित होते.
या उपक्रमाचे आलेगावसह परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक व्यक्त केले. “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानाला अशा सामाजिक उपक्रमांमुळे अधिक बळ मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
