कवठे महांकाळ || प्रतिनिधी :
कवठे महांकाळ तालुक्यात आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात लांबल्या आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर आता शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे.
पावसाअभावी अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. हंगामाचा कालावधी पुढे सरकत असताना उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत शेतकरी शेतात उतरले असून पेरणीची लगबग सुरू झाली आहे.
यंदाच्या कमी पावसामुळे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये अद्यापही चिंतेचे वातावरण आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पिकांच्या वाढीस मदत होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
