• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूर तालुक्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | श्रीरामपूर प्रतिनिधी

राज्यात सन २०२६-२७ या वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी केले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

RelatedPosts

वाहतूक कोंडी, बुलेटचा कर्णकर्कश आवाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; माहूर पोलिसांकडे निवेदन

बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश; युवा क्रांती फाउंडेशनच्या पाहणीत गंभीर त्रुटींचा दावा

दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुमठा जलशुद्धीकरण केंद्र; शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित

या सुधारित योजनेअंतर्गत भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस तसेच खरीप कांदा या प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार असून, अर्ज स्वतः किंवा बँक अथवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या माध्यमातून भरता येईल.

योजनेसाठी आवश्यक अटी

  • जमिनीची अधिकृत कागदपत्रे व पीक लागवड घोषणापत्र आवश्यक.
  • आधार क्रमांक बँक खात्याशी तसेच आधार-संलग्न पेमेंट प्रणालीशी जोडलेला असावा.
  • किमान ०.१० हेक्टर क्षेत्रावर संबंधित पीक लागवड असणे आवश्यक.
  • विमा अर्जातील पीक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक यामध्ये तफावत आढळल्यास सर्व्हेमधील नोंद अंतिम मानली जाईल.
  • चुकीची माहिती देऊन किंवा गैरमार्गाने अर्ज केल्याचे आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांनी सांगितले की, योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे विविध कृषी योजनांपासून वंचित ठेवण्यात येऊ शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अचूक माहिती देऊन नियोजित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृषी विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांचे संरक्षण सुनिश्चित करावे, असेही आवाहन केले आहे.

Tags: Vijay Bhavar
Previous Post

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

Next Post

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Related Posts

Blog

वाहतूक कोंडी, बुलेटचा कर्णकर्कश आवाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; माहूर पोलिसांकडे निवेदन

July 16, 2026
0
Blog

बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश; युवा क्रांती फाउंडेशनच्या पाहणीत गंभीर त्रुटींचा दावा

July 16, 2026
0
Blog

दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुमठा जलशुद्धीकरण केंद्र; शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित

July 16, 2026
0
Blog

बोगस बियाणांचा पर्दाफाश! शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार बळवंत वानखडे; चौकशीचे आदेश

July 16, 2026
2
Blog

सपकळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. रुक्मिणी रामचंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड

July 16, 2026
8
Blog

उषाताई साठे हत्या प्रकरण : फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मागणीला प्रशासनाची दखल; निवेदन वरिष्ठांकडे पाठविणार

July 16, 2026
7
Next Post

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

ताज्या बातम्या

वाहतूक कोंडी, बुलेटचा कर्णकर्कश आवाज आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; माहूर पोलिसांकडे निवेदन

July 16, 2026

बेकरीतील अस्वच्छतेचा पर्दाफाश; युवा क्रांती फाउंडेशनच्या पाहणीत गंभीर त्रुटींचा दावा

July 16, 2026

दीड वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत कुमठा जलशुद्धीकरण केंद्र; शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचित

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In