
उमरगा | प्रतिनिधी
साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (18 जुलै) उमरगा शहरातील डॉ. अण्णा भाऊ साठे चौक येथे सकल मातंग समाज, उमरगा-लोहारा तालुक्याच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव करत शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या न्यायासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाच्या कार्याला पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमास विजय तोरडकर, संजय सरवदे, सुधाकर बनसोडे, राजाभाऊ शिंदे, केशव सरवदे, ॲड. सुखदेव होळीकर, राम कांबळे, बाळू शिंदे, श्री. गडकर, विशाल गायकवाड, अल्का ताई कांबळे, विष्णुपंत खंडागळे, मुकेश गायकवाड, अमर कोथंबिरे, सुधाकर शिंदे, व्यंकट शिंदे यांच्यासह मातंग समाजातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी विचारांचे जतन करून ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.


