राजापूर प्रतिनिधी राजापूर तालुक्यातील आंबेर कोणी साखर गावातील माजी उपसरपंच रवींद्र पुनाजी राडये व सौ ऋतिका राडये या दोघा नवरा बायकोने ह्याच गावातील संगीता अशोक धुमाळ हिला गोड गोड बोलून दागिने व पैसे बळजबरीने मागून घेतले तुला आमचं काम झालं की परत देतो अशा भूलथापा मारून दागिने व पैसे लंपास केले संगीता धुमाळ यांनी यानंतर या दोघांना विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली .
संगीता धुमाळ यांनी संतप्त होऊन पहिले गावातील तंटामुक्ती मध्ये तक्रार दाखल केली यानंतर पोलीस स्टेशन नाटे येथे फिर्यादी फिर्याद ही दाखल करण्यात आली यानंतर माजी सरपंच राडये यांनी तुला दागिने व पैसे 31 जुलै पर्यंत देतो असे सरकारी नोकरी करून व पोलिसांसमोर लेखी स्वरूपात लिहून दिले मात्र या नवरा बायको नी त्याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामध्ये ही महिला सतत पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मिळवण्यासाठी धडपड करत होती ह्या सर्व त्रासाला कंटाळून ह्या महिलेने सरळ मुंबईला मंत्रालयामध्ये जाऊन थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन न्याय मिळवण्यासाठी विनवणी केली आहे या महिलेला न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या 15 ऑगस्ट ला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या प्राणंगणात आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.








