पातूर प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त आलेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या शिबिरात ८० बाटल्या रक्तदानाचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
हे रक्तदान शिबिर दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत नूतन विद्यालय, आलेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. अशा गरजू रुग्णांसाठी रक्तदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी सांगितले.
“स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र निमित्ताने रक्तदान करून मानवतेची सेवा करूया. आपल्या रक्तदानामुळे गरजू रुग्णांना मदत होऊ शकते,” असे आवाहन निलेश कापकर यांनी केले.
आलेगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदानासाठी पात्रता व आवश्यक अटींबाबत संबंधित वैद्यकीय रक्तपेढीच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान करता येणार आहे.




