लाडकोरबाई माध्यमिक शाळा व विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
रॅलीला व्हॉलटरी शाळेपासून सुरुवात झाली. जनता चौक, नगरपालिका, गांधी पुतळा, डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळा, स्टेट बँक, विकास हायस्कूल या मार्गावर विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला व रॅलीचा समारोप
पुन्हा शाळेच्या प्रांगणात पोहोचून समारोप करण्यात आला. यावेळी सुमारे २०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज हातात धरून विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान शहरातील विविध भागांत नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून विद्यार्थ्यांचे व रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी आणि तिरंग्याच्या दिमाखदार उपस्थितीने संपूर्ण शहरात देशभक्तीची भावना जागृत झाली. यासाठी उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील, संस्थेचे सचिव अँड. श्री.राजेश कुलकर्णी, सौ.प्रवीणा कुलकर्णी, विद्यार्थी परिषदेचे रोहित माळी, मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे, प्राचार्य नयना पाटील, सुनिता पाटील, विजया पाटील आदी
उपस्थित होते.









