टेंभुर्णी ब्रॅंच अंतर्गत सापटणे (टें) गावात संत निरंकारी मिशनचा मानव जागृतीचा संदेश
सापटणे (टें), ता. माढा : मुक्त पूर्व दिनानिमित्त संत निरंकारी मिशन, टेंभुर्णी ब्रॅंचच्या वतीने सापटणे (टें) गावात मानव जागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी प. आ. सुनील शिंदे जी यांच्या प्रवचनातून मानवता, प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
प. आ. सुनील शिंदे जी यांनी आपल्या प्रवचनातून मानवी जीवनाचे महत्त्व विशद केले. आध्यात्मिक विचार मांडताना “८४ लाख योनींनंतर मानव जन्म प्राप्त होतो” असे सांगून मिळालेले मानवी जीवन अत्यंत मौल्यवान असून, त्याचा उपयोग मानवसेवा, परोपकार, प्रेम, सद्भावना आणि परमात्म्याच्या स्मरणासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.
जात, धर्म, भाषा व प्रांताच्या भेदभावापलीकडे जाऊन सर्वांनी प्रेमाने व माणुसकीने वागावे. मानवसेवा हेच जीवनाचे खरे सार असून समाजात शांतता, सद्भावना आणि परस्पर प्रेम वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
. संत निरंकारी मिशनचे सर्व अनुयायी उपस्थित मान्यवरांना प. आ. सुनील शिंदे जी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी विचारांचा संदेश देताना—
“मीठी वाणी बोलिये, मन का आपा खोय।
औरन को शीतल करे, आप भी शीतल होय॥”
या विचारातून गोड वाणीने बोलावे, अहंकाराचा त्याग करावा आणि आपल्या मधुर वर्तनाने इतरांना आनंद व शांती द्यावी, असा मौलिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.









