श्रीगोंदा : प्रतिनिधी
साम टी व्ही चे अहिल्यानगर येथील प्रतिनिधी सुशील थोरात यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा ‘ व्हाइस ऑफ मिडिया ‘ श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला.तसे निवेदन श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना निवेदन दिले.
पत्रकारांवर होणारे हल्ले म्हणजे थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार समाजात निडरपणे आणि सत्य बाहेर आणण्याचे काम करतात .अशा कर्तव्य कठोर पत्रकारांना सुरक्षा देणे प्रशासनाचे काम आहे. या प्रकरणातील सर्व दोषी हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी ,अशी आक्रमक मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी व्हाइस ऑफ मिडिया श्रीगोंदा तालुका कार्यकारणी पदाधिकारी व स्थानिक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.







