श्रीगोंदा : प्रतिनिधी
देशाच्या सीमेवर ऊन वारा पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची परवा न करता अहोरात्र कर्तव्य बजवणाऱ्या जवानांना प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीगोंदा येथील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यायात. रक्षाबंधनाचा अनोखा आणि भावपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.गेल्या सहा वर्षापासून विद्यार्थिनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या सीमेवरील सैनिक बांधवांना पाठवत आहेत. रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सण नसून देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाशी आपले ऋणानुबंध दृढ करण्याचा दिवसही आहे. या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यंदाही शाळेतील विद्यार्थिनी उत्साहाने आकर्षक व कलात्मक राख्या तयार करून त्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या आहेत. सीमेवर सैनिक जागा म्हणून देशातील नागरिक सुरक्षित या भावनेतून विद्यार्थिनींनी राख्यांमधून सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली .
सैनिकांमुळे आपण आपल्या कुटुंबीयांसोबत सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची जाणीव नव्या पिढीला व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.गेल्या सहा वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमामुळे शाळा, विद्यार्थीनी व सैनिक यांच्यातील भावनिक नाते अधिक घट्ट होत असून रक्षाबंधनाला देशभक्तीची अनोखी किनार लाभत आहे. विद्यार्थिनींच्या हातून तयार झालेली प्रत्येक राखी ही सीमेवरील जवानांसाठी केवळ धागा नसून देशवासीयांच्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावनिक साधत आहे या उपक्रमासाठी श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. वर्षा भोईटे ,पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे , गुरुकुल प्रमुख किरण शिंदे ,कलाशिक्षिका .उषा ढवळे, श्रीम.सोनवणे मॅडम तसेच केंद्रप्रमुख उत्तरेश्वर मोहोळकर या सर्वांचे सहकार्य लाभले.







