प्रतिनिधी, प्रणय खैरे……… 🖊️..
.
. सारथी महाराष्ट्राचा न्यूज.
स्थानिक मारेगाव शहरात असलेल्या, मार्डी चौक व आंबेडकर चौक. या दोन्ही ठिकाणी सिग्नल लाईट व सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यात 108 गाव असून या गावातील शिक्षण शिकणारे मुले ,मुली व मोठ्या प्रमाणात नागरिकांची येजा होत असते या कारणाने शहरात असलेल्या दोन्ही चौकामध्ये वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्याचप्रमाणे सिग्नल नसल्याकारणाने अपघातही होतात सिग्नल व ट्राफिक हवालदारांची नेमणूक होण्याबाबत प्रशासनाला दोनदा निवेदन देऊनही यावर प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी आपल्या शब्दात दर्शविला आहे. शहरातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळख असलेले अजय सदाशिव रायपुरे, अध्यक्ष बहुउद्देशीय संस्था मारेगाव यांनीही या समस्येबद्दल निवेदन दिले आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येची त्वरित उपाययोजना करावी अशी नागरिकांनी तसेच रायपुरे यांनी आपल्या शब्दात कथित केले आहे. प्राप्त माहितीनुसार.







