सारथी न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल सटाणा
साखरेचे दर वाढत असताना त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने केंद्र सरकारने साखर क्षेत्रातील धोरणाचा फेर विचार करावा अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी केली आहे ग्राहकांना वाजवी दरात साखर आणि शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळेल अशी संतुलित व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोल्हापूर बाजारपेठेत साखरेचा घाऊक दर सुमारे रू ५,३५०प्रति क्विंटल, तर मुंबईत किरकोळ दर ६१ रुपये प्रति किलोच्या आसपास पोहचला आहे. उत्पादनातील गट आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे दरवाढीचा दबाव निर्माण झाला आहे दर नियंत्रणासाठी केंद्राने १० लाख मॅट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे मात्र आयातीमुळे देशांतर्गत दर घसरल्याचा त्याचा फटका ऊस उत्पादकांना बसू नये याची काळजी घेण्याची मागणी जाधव यांनी केली आहे. ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करावी साखरेच्या वाढलेल्या बाजारभावाचा योग्य हिस्सा उस उत्पादकांना बोनस अथवा प्रोत्साहन पर दरातून द्यावा साखर आयात धोरणाचा शेतकरी हिताच्या दृष्टीने विचार करावा शेतकरी व ग्राहक हिताचे दीर्घकालीन साखर धोरण जाहीर करावे अशा मागण्या शेतकऱ्यांनी व जाधव यांनी केंद्र सरकारकडे करण्यात आले आहे.
@@ प्रतिक्रिया
साखरेच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला होत नाही आणि भार मात्र ग्राहकाला सहन करावा लागतो. ही विसंगती दूर झाली पाहिजे,सरकारने तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन धोरण आखुन ग्राहकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
हरि आण्णा जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सटाणा







