
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव-जालना रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संबंधित शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), जिल्हाधिकारी तसेच बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. भूसंपादनासंदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी व मागण्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीची तारीख लवकरच कळविण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे होणाऱ्या बैठकीस सर्व बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी शिवराज भाऊ पाटील, ॲड. निखील पाटील, ॲड. स्वप्निल पाटील, शशिकांत पाटील, विकास पाटील, गोलू बाविस्कर, संजय पाटील, दीपक खडके यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
जळगाव-जालना रेल्वे प्रकल्पातील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागावा आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आगामी बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
