रिसोड | प्रतिनिधी :
रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ धरणातील जलसाठा पावसाअभावी खालावला असून, सध्या धरणात केवळ ३५ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती आहे.
आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास जलसाठ्यात आणखी घट होऊन रिसोड शहरासह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
