प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.
वृत्तसेवा कुरुंदवाड :-पुणे येथील टाऊन हॉल, चिखली, पिंपरी – चिंचवड येथे शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीच्या कन्या वैष्णवी पाटील पर्यावरण पूरक कार्यक्रम घेत वनराई निर्माण करणे हा उद्देश ठेऊन यांनी
निसर्ग व पर्यावरण, वृक्ष संवर्धनाच्या कार्यामध्ये ज्यांनी 40 वर्ष परिश्रम घेत 545 मानवनिर्मित देवराई उभ्या केल्या. लाखो रोप निशुल्क वितरण केले, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांना मार्गदर्शन व सेवा कार्यासाठी रोप देऊन बळ दिले.ज्यांच्याकडून प्रेरणा व मार्गदर्शन घेऊन आरंभ फाउंडेशनच्या संस्थापिका वैष्णवी पाटील यांनी कार्याला सुरुवात केली . गुरुवर्य व ऋषीतूल्य ढोले सर त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करताना बीज तुला सोहळा व निसर्गप्रेमींचा स्नेह मेळावा पार पडला.यासाठी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी संवेदनशील नागरिक उपस्थित होते.
सह्याद्री देवराईचे अभिनेते सयाजी शिंदे ,उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरुरकर
माजी सहाय्यक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
‘आता थांबायचं नाय’ या प्रेरणादायक चित्रपटाचे खरे नायक, सृष्टी सिद्धार्थ सोनवणे सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र बीड , वनस्पती अभ्यासक सुहास वायंगणकर , वृक्षदायी प्रतिष्ठानचे शिवाजी महाराज मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी ” देवराईचा सोटमूळ म्हणजे ढोले सर “असा उल्लेख केला. उदयकुमार शिरूरकर यांनी मातीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर कसा करावा यावरती मार्गदर्शन केले.
सुहास वायंगणकर सर यांनी सह्याद्रीतील दुर्मिळ वन संपदा याचे जतन व सह्याद्री वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे किती महत्त्वाचे आहे असे सांगितले.
यावेळेस दुर्मिळ देशी झाडांच्या बियांची प्रदर्शनी, निसर्गावर आधारित पुस्तकांचा स्टॉल, सुहास कडू यांचा मानवनिर्मित पाणवठा, सह्याद्रीतील दुर्मिळ वनसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी, मानवनिर्मित देवराई यावरती मार्गदर्शन लाभले. बीज तुले साठी 71 प्रजातीच्या देशी झाडांच्या बिया ठेवण्यात आल्या. बासरी वादन पिनाकी अग्निहोत्री ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील ,मानपत्र वाचन राहुल घोलप व “मी देवराई बोलते “हे पत्राचे वाचन भोलेश्वर पलंगे यांनी केले..
महाराष्ट्रातून बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर,ठाणे, छत्रपती संभाजी नगर ,मुंबई, कोल्हापूर ,लातूर ,बीड , सांगली,नांदेड ,धाराशिव, पिंपरी चिंचवड ,पुणे येथील सर्व निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात डॉ. विद्याताई कोपिकर, श्री. शिवशंकर दगडू चापूले, आम्ही जांभळीकर फाउंडेशन, जांभळी, श्री. भागिनाथ बाबासाहेब आसने, कु. राघव भोलेश्वर पलंगे, श्री. जगदीश बिडवे, श्री. प्रशांत बडगुजर, योगिता भूषण वाडीवकर, श्री. मल्लिकार्जुन हलकंचे, श्री. रवींद्र शिंदे, श्री. विनोद महादेव लांडे, श्री. वैजनाथ रामभाऊ गडगिळे, श्री. मच्छिंद्र गेनबा घनवट, विश्व कल्याण इंग्लिश मीडियम स्कूल, गुरुकुल विद्यालय चिखली आणि श्री. अनुज खरे – नेचर वॉक ट्रस्ट, शिवनंदन पाटील यांना त्यांच्या उल्लेखनीय निसर्ग व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याबद्दल निसर्ग सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच निसर्ग विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
बीजवाटप व रोपे वाटप करण्यात आले. वैशाली गायकवाड, सुहास कडू, सिद्धेश्वर कोरे, विनायक पाटील ,तानाजी भोसले, माणिक खराडे,रूपाली पाटील ,डॉ.संपदा जोशी, पुष्पा आफळे, वंदना तांबडे, उमेश पवार , गौतम इंगळे,उल्हास पठाडे, हिरा भंडारे , सुमन नवले, मनोरमा कोरे,अजिंक्य जकीनकर,आदित्य पाटील, भोलेश्वर पलंगे, नेहा पाटील, श्रावणी पाटील ,समृद्धी पाटील संस्थेच्या सर्व सदस्यांनी सुंदर आयोजन आणि नियोजन करून कार्यक्रम पार पडला.










