अमरावतीत कायदा-सुव्यवस्था रामभरोसे ?
अविनाश गोंडाणे
अमरावती (प्रतिनिधी )-
शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अमरावती शहरातील रवी नगर चौकात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अंबा विहार परिसरात राहणारी आणि बियाणी महाविद्यालयात शिकणारी 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी शर्वरी गणेश हाडके हिची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शर्वरी कॉलेजला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि रवी नगर चौकात गाठून तिच्यावर चाकूनेसपासप वार केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी ती मृत घोषित केले. या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावतीकरांचा संतप्त सवाल:
“शहरात कायद्याची भीती राहिली आहे की नाही? गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक का उरलेला नाही?” असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेकडून आणि अमरावतीकरांकडून विचारला जात आहे. भरदिवसा घडणाऱ्या अशा प्रकारच्या खुनी आणि हाणामारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून वचक निर्माण करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
__अविनाश गोंडाणे अमरावती 9923264193




