………………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे….. 🖊️….. सारथी महाराष्ट्राचा न्यूज…… जाहिरात व सत्य घटनेवर आधारित बातमीकरिता संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 93 71 53 0273. स्थानिक मारेगाव, शहरातून जाणारा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आलेला रस्ता ठिकठिकाणी विस्कळीत झाल्याचे दृश्य उघडकीस आले असून यावर प्रशासन आंधळे बनवून बसले असल्याचा प्रश्नचिन्ह या रस्त्यावरील येजा करणाऱ्या स्त्रिया, प्रतिष्ठित नागरिक, शाळकरी मुले, तालुक्याच्या ठिकाणी येणारे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण.
इत्यादींना या रस्त्यामुळे अत्यंत दुखदायक प्रवास करावा लागत असल्याचे प्रत्यक्ष नागरिकांनी आपले मत व्यक्त केले असून प्रशासन मात्र आंधळे बनवून बसले आहे असा प्रश्नचिन्ह नागरिकांनी आपल्या शब्दात कथित केला आहे. मतदानाच्या वेळेस मत मागायला येता परंतु आमच्या समस्या कोण सोडवणार असेही प्रतिष्ठित नागरिक तसेच रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करून प्रशासनाविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे, नागरिकांच्या समस्या प्रशासनाने सोडवाव्या अन्यथा येणाऱ्या मतदानामध्ये आम्ही बहिष्कार टाकू असेही मत या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार.





