वाशी तालुका प्रतीनीधी :राजेंद्र आहिरे
नगदी पीक म्हणून ओळख असलेले सोयाबीन आज मितीला पावसा आभावी करपून गेले आहे.शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला घास हा वरूण राज्याच्या प्रदीर्घ खंडामुळे आक्षरशा हिसकावून घेतला आहे.या वर्षी पावसाळा सुरु झाल्यापासून वाशी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेलाच नाही खरिपाचे 43 हाजार 714हेक्टर क्षेत्र आसताना केवळ 43 हाजार 653 हेक्टरवर (97.60%)पेरणी झाली.जूनमध्ये पावसामुळे 1हाजार 61हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिले. जूनच्या शेवटी झालेल्या पेरण्यानंतर 15ते 20दिवस पावसाचा खंड पडला .सर्वाधिक पेरणी झालेल्या41हाजर 256हेक्टरवरील सोयाबीन करपून गेले आहे.सोयाबीनच्या उत्पन्नात खुप मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.तोंडावर आलेला बैलपळा सण आक्षरशा सुतक पडल्यासारखा झाला आहे.वाशीच्या बाजारपेठेत सणाच्या खरेदी दिसत नाही.बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतोय.








