• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 11, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

विदर्भात जून व जुलै महिन्यात अत्यल्प व खंडित पाऊस झाल्याने पेरणी लांबली, नंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस अनियमित व खंडित झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह सर्व खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने तातडीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

RelatedPosts

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

आमदार सावरकर म्हणाले, जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादनात मोठी घट होणार आहे. विहिरी, बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी ३१ जुलै रोजी पीक विमा अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केवळ मुदतवाढ पुरेशी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमदार सावरकर यांनी समस्येवर उपाय योजनेखातर केलेल्या प्रमुख मागण्या अशा :

१. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.
२. पीक विमा योजनेअंतर्गत तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
३. विम्याच्या कक्षेबाहेरील शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
४. सोयाबीनसह सर्व पिकांना हेक्टरी विशेष मदत द्यावी.
५. पीक कर्ज वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे.
६. पुढील हंगामासाठी बियाणे, खते व निविष्ठांसाठी मदत द्यावी.
७. जनावरांसाठी चारा डेपो व पाण्याची व्यवस्था करावी.
८. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत व दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी.

विदर्भातील शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे.

सातत्याने शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले, अभियंता असलेले, स्वतः शेतकरी असलेले, ग्रामीण आणि शहरी भागाच्या समस्यांची जाण असणारे आमदार रणधीर सावरकर सातत्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांच्या भावना-संवेदना आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने करत असतात. आणि १४ कोटी महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी झटणारे देवा भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेऊन आमदार सावरकरांच्या मागणीची दखल घेऊन त्याची पूर्तता करून आधार देण्याचे व न्याय देण्याचे काम करतील. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांविषयी ग्रामीण नागरिकांशी जोडलेली नाळ असणारे आमदार सावरकर यांच्या मागणीची पूर्तता मुख्यमंत्री करतील, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेषतः पश्चिम विदर्भाच्या शेतकऱ्यांची व्यथा तसेच पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या भूमिका तसेच वर्धा पासून सहा जिल्हे आत्महत्याग्रस्त शेतकरी ही असलेली प्रतिमा दूर करण्याचा सरकारचा असलेला प्रयत्नाला पुन्हा सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री न्याय देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी रामचंद्र नावकार

Previous Post

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

Next Post

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

Related Posts

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!
Blog

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026
0
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
20
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
24
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
50
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
28
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
7
Next Post
आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

ताज्या बातम्या

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

आश्रमशाळांतील निकृष्ट अन्नधान्याचा मुद्दा ऐरणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

September 11, 2026

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची आज दि. ८ सप्टेंबर रोजी भेट घेऊन आमदार रणधीर सावरकरांनी विदर्भातील खरीप हंगामातील निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती दिली – शेतकऱ्यांच्या समस्या मांडून मदतीचे विशेष पॅकेज द्या, आमदार रणधीर सावरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

September 11, 2026

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In