


🎤 मागील 9 वर्षा पासून अविरतपणे सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे वाण नाहीतर दान हा उपक्रम राबवतात..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
रेणापूर – शिक्षणाच्या आधुनिक सुविधांनी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने सौ. मीराताई दादासाहेब टेंगसे यांनी “वाण नाहीतर दान” या उपक्रमाच्या माध्यमातून रेणापूर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी दोन संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांचे शैक्षणिक स्तर उंचावावा, या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पारंपरिक भेटवस्तू किंवा वाण स्वीकारण्याऐवजी सामाजिक उपक्रमांसाठी मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.रेणापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख व्हावी आणि भविष्यात स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी त्यांना सक्षम करता यावे, यासाठी दोन संगणक प्रणालींसाठी आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली.
या मदतीमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल होईल.सामाजिक भान जपत शिक्षण क्षेत्राला मदतीचा हात देणाऱ्या या उपक्रमाचे समाजातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
हळव्या स्वभावाच्या प्रेमळ लोकनेत्या मीराताईचा दांडगा जनसंपर्क आहे. जेवढ्या कणखर पणे त्या निर्णय घेतात तेवढ्याच त्या हळव्या हि आहेत. एक वेळेस टीव्ही वर बातमी पाहत असतांना एका आत्म्हत्याग्रस्त कुटुंबाची बातमी दाखवत होते. ते पाहून त्या खूप दुखी झाल्या. फक्त दुखी होऊन थांबल्या नाहीत तर. कोणी आत्महत्याच करणार नाही यासाठी त्या विचार करू लागल्या आपल्या संस्कृती प्रमाणे अनेक महिला संक्राती सणाला महिलांना वान म्हणून हजारो रुपये खर्च करतात. पण सौ.मीराताई टेंगसे यांना हे मान्य नाही. त्यांनी वान वर होणारा खर्च आपल्या आसपास असलेल्या आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे म्हणजेच १८ अस्या शालेय मुलांचे शैक्षणिक खर्च तब्बल प्रती विध्यार्थी ४ हजार प्रमाणे ७२००० रुपये ची वान देऊन संक्रांति सण साजरा केला. हे फक्त एकाच वर्षासाठी नसून आज पावोत त्या वाणावरील खर्च टाळून त्या गरजू व गोर-गरीब मुलांना शैक्षणिक साहित्याची वाटप करतात.
राजकारणासोबतच समाजकार्याची जाणीव असणाऱ्या माजी कृषी,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सभापती सौ.मीराताई टेंगसे यांनी जिल्हा परिषद एवढेच सांभाळले नाहीतर अनेक समाज कार्य हि केले आहेत. जसे पाथरी तालुक्यातील मराठा मुलांसाठी चालू केलेल्या अभ्यासिकेसाठी त्यांनी मदत केली.एका गरीब कुटुंबातील मुलगी जि आपला शैक्षणिक खर्च धुनी-भांडी करून पूर्ण करत होती. तिला अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून तिचा शैक्षणिक साहित्य व खाजगी शिकवणी साठी मदत केली. पाथरी येथील स्टेट बँक ऑफ कृषी शाखा पाथरी समोर शेतकरी उपोषण सुरू असतांना मरडसगाव येथील शेतकरी आत्माराम काळे यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला होता त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले होते कर्ता पुरुष गेल्यामुळे मुलांचे शिक्षण थांबणार होते अश्या परिस्थितीत सौ. टेंगसे देवदूता सारखे उभे राहिल्या. त्यांचे दोन्ही लेकरांची फक्त सांत्वन न करता त्यांचे लेकरांचे सर्व शैक्षणिक खर्च उचलले. आज पर्यंत हे कार्य सुरू आहे. मागील वर्षीहि जागतिक महिला दिनानिमित्त गरीब कष्टकर्यांची मुलगी बोरगव्हान,देवगाव ,सिमूरगव्हाण,देवनांद्रा येथील प्रत्येकी एका विद्यार्थीनीला मदत दिली आहे.या वर्षीही उपक्रमाच्या माध्यमातून रेणापूर जिल्हा परिषद शाळेसाठी दोन संगणक प्रणालींची मदत केली . या वेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती सौ.मीराताई दादासाहेब टेंगसे , सोमनाथ डोंगरे ,नेताजी वाघाळे ,पंकज बिराजदार ,सुमनताई टेंगसे ,शिवकण्याताई पौळ,तुकाराम पौळ आदि उपस्थित होते.
वृक्ष वली आम्हा सोयरे, वनचरे ! या प्रमाणे त्यांनी रेणापूर येथे आपल्या शेतात व परिसरात वेगवेगळी वृक्ष लावून त्यांची जोपासना हि स्वतः करत असतात. सौ.टेंगसे यांनी ज्ञानेश्वर नगर देवनांद्रा पाथरी येथील सर्व महिलांना एकत्र करून वटसावित्री पौर्णिमा या दिवशी फक्त वडाची पूजा न करता त्या दिवशी ज्ञानेश्वर नगर भागात वडाची वृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली अशी वेगवेगळी सामाजिक कार्य त्या सतत करत असतात.जि.प.परभणी सभापती पदी सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे यांची निवड झाली व त्यांना कृषी ,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय हे खाते मिळाली होते. या खात्याच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताची कामे केली आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची शेती अवजारे,शेतकरी मेळावे,पशुप्रदर्शन,लसीकरण मोहीम कृषी प्रदर्शन अश्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा केली.लम्पि स्किन डिसीज हा महाभयंकर जनावरांच्या आजाराने शेतकरी परेशान असतांना सर्कल वाईज लसीकरण शिबीर घेऊन महिला फक्त घरातील लेकरे व घर सांभाळण्यासाठी नसून देश,राज्य हि सांभाळू शकतात हे सिद्ध केले आहे व असे समाजहिताचे कार्य त्या सतत करत असतात..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post