मागील दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यात सतत पडणाऱ्या पावसाने जोमात आलेल्या पिकांची पूर्णपणे नासाडी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता.
त्यावेळी या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली होती. मात्र सरकारने २०२२ च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे मात्र अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेतिपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त २५ कोटी ९७ लाख ८९ हजार रुपयांचा लाभ होणार आहे.या नुकसानीपोटी २० जून २०२३ रोजी नगर जिल्ह्यासाठी २४१ कोटी १ लाख ४३ हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे…..
Discussion about this post