कोरेगाव तालुका प्रतिनिधी: नितीन मोरे
कसं जुळणार आकड्याच गणित
झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच असणार असा केलाय दावा
आधीच पालकमंत्री शंभूराज देसाई चांगले इरेला पेटलेत त्यांनी झेडपीचा गट स्थापन केलाय आणि पंचायत समितीचा स्थापन करायला वकिलांना कागद गोळा करायला लावलीत, वरून एकनाथ शिंदे साहेबांना सातारा
जिल्ह्यातलं अन सांगलीतलं झेडपी सदस्यांच्या मनातलं सगळं सांगणार आहे, असं सांगतायत. शिवसेनेनं सातारा जिल्ह्यात झेडपीमधी 15 सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये 29 सदस्य निवडून आणल्यात. तरीपण जोर लावलाय. सगळ्यांच्या म्होरं शिवसेनेचं नेते थोर अशी आताची स्थिती आहे.
राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने अजून तशी कोणतीच हालचाल केली नाही एक भेट वगळता, गट नोंदणी सुद्धा केली नसल्याची अधिकृत माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा परिषद सदस्य 20 आणि पंचायत समितीचे सदस्य 43 निवडून आलेत.
त्यांच्याकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसले गेल्याने काहीतरी पडद्याआड सुरू आहे असेच म्हणावे लागेल तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे केवळ 3 पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचा 1 झेडपी सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्य, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेडपी सदस्य 1 आणि 1 अपक्ष, भाजपचे झेडपी सदस्य 27 आणि पंचायत समिती सदस्य 53 असे संख्या बळ आहे. महायुतीचेच तीन पक्ष संख्येने जास्त आहेत पण तीन तिघाडे आणि काम बिघाडे या मराठीतल्या म्हणी प्रमाणे तिघे एकत्र येणार नाहीत आणि तिघांना एकत्र येऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातलेत, त्यात
आम्हालाच अध्यक्ष पद द्यावे अशी काही मागणी सुद्धा तिघांची एकत्रितपणे बैठक होऊन झाली नाही आणि तशी होण्याची चिन्हे ही दिसत नाहीत. मात्र, काल च्या भाजपच्या सातारच्या सत्कार सोहळ्यात सोलापूरचे पालकमंत्री जयाभाऊनी झेडपी अध्यक्ष हा भाजपचाच होईल असा दावा केला आहे,
तसे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून त्यांनी जरी यार्कर किंवा गुगली चेंडू टाकला असला तरी ते नेमके कोणत्या संख्या बळावर बोललेत हे मात्र समजले नाही संख्येने भाजप जास्त असले तरी पंचायत समितीच म्हणायचं तर भाजपकडे सातारा 10, कराड 15 आणि खटाव 8 येथे एक हाती सत्ता स्थापन होऊ शकते फलटण मध्ये भाजपचे 5 आणि अजितदादा गट 3 आणि शिवसेना 8 म्हणजे येथे गणित समसमान बनले आहे कारण अजितदादा गटाचे आमदार सचिन पाटील हे तसे पाहता माजी
खासदार रणजितदादा यांच्या सोबत असतात, त्यामुळे इथला चिठीवरचा खेळ होऊन कोणाच्या पारडे जड होणार ते पहायला मिळणार आहे, माण मध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 5 असे समसमान चित्र असल्याने तिथं सुद्धा चिठीचा खेळ असणार आहे, बाकी इतर ठिकाणी भाजप म्हणायचे तर खंडाळा येथे अजितदादा गट दुप्पट असल्याने तेच दावा करणार, कोरेगावात सुद्धा अजितदादा गट वनसाईड आहे वाई मध्ये सुद्धा आहे. जावळीत भाजप 3 आणि राष्ट्रवादी अजितदादा 1, शिवसेना 2 म्हणजे तिथं ही त्रांगड आहे, महाबळेश्वरात भाजपाला काहीच नाही म्हणजे पंचायत समितीच्या संख्याबळ साधण्यात सुद्धा भाजपला चिठीचा आधार घ्यावा लागणार असून नेमकी मॅजिक फिगर कशी साधणार?,
जयाभाऊंच्या डोक्यात काहीतरी ऑपरेशन लोटस असावे असे त्यांच्या विधानावरून वाटते. तर शंभूराज देसाई यांनी जरी प्लॅन ए म्हणत दबाव तंत्र सुरू ठेवले असल्याचं चित्र असलं तरी अंतर्गत काही तरी नक्की सुरू असावे, बघुयात, जयाभाऊ नेमके काय करतात ते..




