• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू; साडेतीन लाखांचे नुकसान

by
February 23, 2026
in Blog
0
विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू; साडेतीन लाखांचे नुकसान
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

📍 लांझी-हिरापूर, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लांझी-हिरापूर येथे विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार हरपला असून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पातून पुढील ४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, एक म्हैस अनिल गवळी यांच्या मालकीची तर दोन म्हशी सोमनाथ रामदास पवार यांच्या मालकीच्या होत्या. दुग्ध व्यवसायावर कुटुंबाचा खर्च भागवणाऱ्या या शेतकऱ्यांवर अचानक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पशुधन हाच ग्रामीण भागातील कुटुंबांचा आधार असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी भगवान खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उपसरपंच योगेश आरगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रवि मनगटे, नंदू सोनवणे, बाबासाहेब आरगडे, सचिन जमधडे व अक्षय भवर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती घेत महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला.

ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करत शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. “ग्रामीण भागात पशुधन हेच कुटुंबाचे बळ असते. एका क्षणात तीन म्हशी दगावल्याने या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

पीडित शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे मदतीची याचना करत, “आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. भरपाई मिळाल्यास आम्हाला मोठा आधार मिळेल,” अशी व्यथा मांडली.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात वीज पुरवठा यंत्रणेची तपासणी करून सुरक्षितता उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नेतृत्वाने “गावातील कोणतेही कुटुंब संकटात असताना आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू,” असे आश्वासन देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सांगितले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे पीडित कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Source: JAKIR A.shaha
Via: जाकिर ए शाहा
Tags: Shah Ayyaub
Previous Post

माहितीच्या बदल्यात फोनपे वर हजारो रुपये? – हर्षवर्धन जाधव

Next Post

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

Related Posts

Blog

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

July 6, 2026
0
Blog

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

July 6, 2026
1
Blog

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पातून पुढील ४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026
3
Blog

महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा हाहाकार; चतुरबेट गावातील मुख्य रस्ता बंद, कोयना नदी धोक्याच्या पातळीवर

July 6, 2026
35
Blog

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

July 6, 2026
9
Blog

मेळघाटातील चिखलदरा परिसर हिरवागार; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सतर्क

July 6, 2026
20
Next Post

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

ताज्या बातम्या

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

July 6, 2026

कर्जत तालुक्यातील पळसदरी ठाकूरवाडीत दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

July 6, 2026

अमरावती जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पातून पुढील ४८ तासांत पाणी सोडण्याची शक्यता; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In