आलेगाव(जि.अकोला) सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्तसेवा .
आलेगाव येथील वाळकेश्वर स्टेडियमवर आयोजीत झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील युवा फलंदाज आशिष धांडे या खेळाडूने तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. चौकार षटकारांच्या जबरदस्त आतिषबाजीने त्याने आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.
त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे संपुर्ण स्टेडियमवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते .दि.२० फेब्रुवारी रोजी झालेल्या या रंगतदार सामन्यात एकूण चार संघ सहभागी झाले होते. यामध्ये निशान क्रिकेट संघ देऊळगाव च्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अटाळी संघाने प्रथम फलंदाजी करताना २ षटकात १०२ धावांचे कठीण आव्हान उभे केले होते.प्रत्युत्तरादाखल देऊळगाव कडुन सलामीला आलेल्या आशिष धांडे याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.विजयासाठी १८ चेंडूत ५४ धावांची गरज असताना आशिषने केवळ १४ चेंडूत ५४ धावा काढून विजयात्मक कामगिरी केली.या डावात तो ८२ धावांवर नाबाद राहीला.

दुसर्या सामन्यात हिंगणा (शळद) संघाने ७ षटकात ८७ धावांचे आव्हान दिले होते हे आव्हान स्वीकारून देऊळगाव संघाने आशिष धांडे च्या उत्कृष्ट कामगिरीवर अवघ्या ६ षटकात पुर्ण केले .विशेष म्हणजे दोन्ही डावात नाबाद राहुन आशिष ने एकूण १५६ धावांची विक्रमी नोंद करत आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेला.
आशिष याने कोणतीही सुविधा आणि प्रशिक्षण नसताना केवळ सरावामुळे त्याने मारलेल्या दूरवरच्या षटकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयोजक आणि क्रिकेट प्रेमीनीं त्याचा विशेष सत्कार करुन गौरवास्पद कौतुक केले.




