प्रतिनिधी :
येवला : लाखो रुपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेल्या येवला–मनमाड रस्त्याच्या कामाची अवघ्या १५ दिवसांतच पोलखोल झाली आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन आठवडेही उलटले नसताना ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाच्या ढिसाळ देखरेखीमुळे आणि कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्याने तयार झालेला रस्ता अल्पावधीतच खराब झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी वाया गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित कामाच्या दर्जाची चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करावी तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निकृष्ट कामाची चौकशी करावी आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


