• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*””शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन””*

by
February 26, 2026
in Blog
0
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

(मराठा मंदिर मुंबई श्री. रामराव विद्यामंदिर हायस्कूल जतचा विशेष उपक्रम)

सांगली जिल्हा प्रतिनिधी :नितिन बदडे 9881887717

RelatedPosts

कोकणातील मातीचा सुगंध मुंबईत दरवळला; खालुबाजा लोककलेच्या रौप्य महोत्सवाने रंगली सांस्कृतिक मेजवानी

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दिपक बोराडे यांचे आमरण उपोषण; विविध नेत्यांची उपस्थिती

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे यात्रेदरम्यान दोन गटांत हाणामारी;जुन्या वादाचा सूड?

म. मं. श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व जुनियर कॉलेज जत विद्यालयात
२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा
दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी राव शिंदे,उपमुख्याध्यापक श्री.एस. व्ही. भांगरे सर व पर्यवेक्षक श्री.एस. एन. सरक सर व श्री. आर. डी. पाटीलसर
यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारी जगभरातले मराठी भाषिक लोक “मराठी भाषा दिवस” साजरा करतात. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो.


म. मं. श्री. श्री रामराव विद्यालय जत येथे मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रंथप्रदर्शन उपक्रम राबविण्यात आला आहे.
मराठी भाषेतील विविध लेखकांची वाचनीय पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी व अभ्यासासाठी ठेवण्यात आली आहेत. शाळेचे ग्रंथालय सुसज्ज असून यामध्ये सुमारे सतरा ते अठरा हजार पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध आहेत. वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो. म्हणूनच, वाचन ही एक आवश्यक च उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.


संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. पी. डी. साळुंखेसर, श्री. एस. आर. चिपटेसर श्री. इब्बे. डी. डवरी सर, कु. पी.आर. गव्हाणे मॅडम यांनी केले.

Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेतर्फे करणार महिलांचा विशेष सन्मान….

Next Post

रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस प्रारंभ;

Related Posts

Blog

कोकणातील मातीचा सुगंध मुंबईत दरवळला; खालुबाजा लोककलेच्या रौप्य महोत्सवाने रंगली सांस्कृतिक मेजवानी

April 12, 2026
7
Blog

धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी दिपक बोराडे यांचे आमरण उपोषण; विविध नेत्यांची उपस्थिती

April 11, 2026
5
Blog

इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे यात्रेदरम्यान दोन गटांत हाणामारी;जुन्या वादाचा सूड?

April 10, 2026
99
आलेगाव येथील २० वर्षीय विवाहिता बेपत्ता
Blog

आलेगाव येथील २० वर्षीय विवाहिता बेपत्ता

April 10, 2026
57
Blog

म्हसळा तालुक्यात एसआरआय मॅपिंगला वेग,६० ते ७० टक्के काम पूर्ण

April 9, 2026
1
अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला
Blog

अंजनगावच्या सोमेश्वर विद्यालयाचा जिल्हास्तरीय प्रदर्शनात झेंडा रोवला

April 9, 2026
20
Next Post

रिसोड बाजार समितीत चिया खरेदीस प्रारंभ;

ताज्या बातम्या

अथक परिश्रमातून यशाची शिखरे गाठली – अजय कचरे महसूल अधिकारी पदी

April 12, 2026

शहाद्यात शांतता कमिटीची बैठक उत्साहात; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन.

April 12, 2026

आदिवासी टायगर सेनेचा राज्य व सीमापार संघटना विस्ताराचा धडाका

April 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In