मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !
संगणकपरिचालकांच्या मागण्यांवर येत्या 6 मार्चला बैठक घेण्याचे ग्रामविकास विभागाचे लेखी पत्र !
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांनी संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी !
मुंबई येथील लक्षवेधी आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी !
संगणकपरिचालकांच्या मागण्यांवर येत्या 6 मार्चला बैठक घेण्याचे ग्रामविकास विभागाचे लेखी पत्र !
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांनी संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी !
मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायतमध्ये मागील 14 वर्षापासून कार्यरत असलेल्या 20000 संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर “लक्षवेधी आंदोलन करण्यात आले,या आंदोलनात हजारो संगणकपरिचालक सहभागी झाले होते,याची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी विधानभवनात बैठक घेतली असता त्यात संगणकपरिचालकांच्या मागण्यांवर येत्या 6 मार्च रोजी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामविकास विभागाने राज्य संघटनेला दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायत कार्यालयात मागील 14 वर्षापासून ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला विविध प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत असून या सर्व संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह किमान 17000 रुपये मासिक मानधन राज्य शासनाच्या निधीतून देणे,कंत्राटी कामगारा प्रमाणे सुविधा व लाभ देणे,महिला संगणकपरिचालकांना पगारी प्रसूती रजा देणे,सर्व संगणकपरिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा आरोग्य व अपघात विमा मिळणे,राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना संगणक,प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य देणे,या मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 24 फेब्रुवारी 2026 रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते,या आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी झाले होते.या आंदोलनास राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी भेट देऊन पाठींबा दिला,त्याच वेळी ग्रामविकासमंत्री मा.जयकुमार गोरे यांनी शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलवले त्यावेळी झालेल्या बैठकीत संघटनेच्या वतीने आंदोलनात ठेवण्यात आलेल्या सर्व संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे यासह सर्व मागण्या मांडण्यात आल्या,परंतु त्यावर ग्रामविकासमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले नाही,त्यामुळे आझाद मैदानात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाल्या शिवाय न उठण्याचा निर्धार केला,त्यावेळी पोलीस प्रशासनाने संघटनेला सांगितले कि आज देशाच्या राष्ट्रपती मुंबईत आहेत,त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची भेट होणार नाही आपण मैदान खाली करावे त्यावर संगणकपरिचालकानी त्याच ठिकाणी बसण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस प्रशासनाने पोलीस बळाचां वापर करून संगणकपरिचालकांना आंदोलन करण्यापासून रोखले व मैदान सोडण्यासाठी जबरदस्ती केली हि बाब लोकशाहीला शोभणारी नसल्याने संगणकपरिचालकानी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे,दरम्यान आंदोलनातील मागण्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने येत्या 6 मार्च रोजी ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संघटनेला दिले असून,मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवून न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायतमध्ये मागील 14 वर्षापासून कार्यरत असलेल्या 20000 संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर “लक्षवेधी आंदोलन करण्यात आले,या आंदोलनात हजारो संगणकपरिचालक सहभागी झाले होते,याची दखल घेऊन ग्रामविकासमंत्री मा.ना.जयकुमार गोरे यांनी विधानभवनात बैठक घेतली असता त्यात संगणकपरिचालकांच्या मागण्यांवर येत्या 6 मार्च रोजी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामविकास विभागाने राज्य संघटनेला दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की,राज्यातील सुमारे 28500 ग्रामपंचायत कार्यालयात मागील 14 वर्षापासून ग्रामीण भागातील सुमारे 7 कोटी जनतेला विविध प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत असून या सर्व संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह किमान 17000 रुपये मासिक मानधन राज्य शासनाच्या निधीतून देणे,कंत्राटी कामगारा प्रमाणे सुविधा व लाभ देणे,महिला संगणकपरिचालकांना पगारी प्रसूती रजा देणे,सर्व संगणकपरिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा आरोग्य व अपघात विमा मिळणे,राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना संगणक,प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य देणे,या मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर 24 फेब्रुवारी 2026 रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते,या आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणकपरिचालक सहभागी झाले होते.या आंदोलनास राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी भेट देऊन पाठींबा दिला,त्याच वेळी ग्रामविकासमंत्री मा.जयकुमार गोरे यांनी शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलवले त्यावेळी झालेल्या बैठकीत संघटनेच्या वतीने आंदोलनात ठेवण्यात आलेल्या सर्व संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे यासह सर्व मागण्या मांडण्यात आल्या,परंतु त्यावर ग्रामविकासमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले नाही,त्यामुळे आझाद मैदानात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट झाल्या शिवाय न उठण्याचा निर्धार केला,त्यावेळी पोलीस प्रशासनाने संघटनेला सांगितले कि आज देशाच्या राष्ट्रपती मुंबईत आहेत,त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची भेट होणार नाही आपण मैदान खाली करावे त्यावर संगणकपरिचालकानी त्याच ठिकाणी बसण्याचा निर्णय घेतला होता परंतु पोलीस प्रशासनाने पोलीस बळाचां वापर करून संगणकपरिचालकांना आंदोलन करण्यापासून रोखले व मैदान सोडण्यासाठी जबरदस्ती केली हि बाब लोकशाहीला शोभणारी नसल्याने संगणकपरिचालकानी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे,दरम्यान आंदोलनातील मागण्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी ग्रामविकास विभागाने येत्या 6 मार्च रोजी ग्रामविकासमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संघटनेला दिले असून,मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संगणकपरिचालकांचा प्रश्न सोडवून न्याय द्यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.






