
पालघर : तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कुडण, सावराई, कांबोडा, घिवली आणि तारापूर या पाच गावांतील विविध जाती, पंथ आणि संप्रदायातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पहिल्याच प्रयत्नात सुमारे ७०० ते ८०० नागरिक उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाचे आयोजन पाचही गावांतील सकल हिंदू समाजाने स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते. समितीचे अध्यक्षस्थान तारापूरचे समाजसेवक व ज्येष्ठ संघ कार्यकर्ते शाम मधुसूदन करवीर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारापूर गावचे ग्रामस्थ राकेश वैद्य यांनी केले.

मुख्य वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक टोळी सदस्य श्री.अनिल भालेराव यांनी ‘अखिल मानवतेचा विचार म्हणजेच हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. तारकेश्वर महादेव आणि शेजारी असलेल्या मंदिरातील देवीच्या साक्षीने झालेल्या या संमेलनात हिंदुत्व ही केवळ विचारधारा नसून सनातन जीवनपद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदुत्व मानवतेचा, सर्वाच्या कल्याणाचा आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचाराचा संदेश देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हजारो वर्षींच्या आक्रमणांनंतरही हिंदू संस्कृती टिकून राहिली कारण तिचा पाया सत्य, करुणा, आणि तपस्या या मूल्यांवर आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात रा. हि. सावे विद्यालयाच्या तारापूर, माजी शिक्षिका सौ.ज्योत्स्ना दिलीप सावे यांनी ‘हिंदुत्व टिकविण्यात स्त्रियांचे योगदान’ या विषयावर भाष्य केले. हिंदुत्व ही केवळ पूजा पद्धती नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले.देशभक्तीपर गीत, शिवचरित्राचा पोवाडा आणि प्रभावी व्याख्यानांनी संमेलन रंगले पंचपरिवर्तनाचा संदेश देणारी सुंदर रांगोळी कुडण गावच्या भगिनी सौ. पूनम मकरंद पाटील यांनी साकारली. या आकर्षक रांगोळीमुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले असून समाजाला सकारात्मक व प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलादेशभक्तीपर गीत, शिवचरित्राचा पोवाडा आणि प्रभावी व्याख्यानांनी संमेलन रंगले




