• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन

पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन

by
March 10, 2026
in Blog
0
460
SHARES
657
VIEWS
Ad 1
हिंदू संमेलन

पालघर : तारापूर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कुडण, सावराई, कांबोडा, घिवली आणि तारापूर या पाच गावांतील विविध जाती, पंथ आणि संप्रदायातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पहिल्याच प्रयत्नात सुमारे ७०० ते ८०० नागरिक उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचा उद्देश साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाचे आयोजन पाचही गावांतील सकल हिंदू समाजाने स्थापन केलेल्या समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते. समितीचे अध्यक्षस्थान तारापूरचे समाजसेवक व ज्येष्ठ संघ कार्यकर्ते शाम मधुसूदन करवीर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारापूर गावचे ग्रामस्थ राकेश वैद्य यांनी केले.

मुख्य वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक टोळी सदस्य श्री.अनिल भालेराव यांनी ‘अखिल मानवतेचा विचार म्हणजेच हिंदुत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. तारकेश्वर महादेव आणि शेजारी असलेल्या मंदिरातील देवीच्या साक्षीने झालेल्या या संमेलनात हिंदुत्व ही केवळ विचारधारा नसून सनातन जीवनपद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदुत्व मानवतेचा, सर्वाच्या कल्याणाचा आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचाराचा संदेश देणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हजारो वर्षींच्या आक्रमणांनंतरही हिंदू संस्कृती टिकून राहिली कारण तिचा पाया सत्य, करुणा, आणि तपस्या या मूल्यांवर आहे, असे ते म्हणाले.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

कार्यक्रमात रा. हि. सावे विद्यालयाच्या तारापूर, माजी शिक्षिका सौ.ज्योत्स्ना दिलीप सावे यांनी ‘हिंदुत्व टिकविण्यात स्त्रियांचे योगदान’ या विषयावर भाष्य केले. हिंदुत्व ही केवळ पूजा पद्धती नसून भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धतीचा संगम असल्याचे त्यांनी सांगितले.देशभक्तीपर गीत, शिवचरित्राचा पोवाडा आणि प्रभावी व्याख्यानांनी संमेलन रंगले पंचपरिवर्तनाचा संदेश देणारी सुंदर रांगोळी कुडण गावच्या भगिनी सौ. पूनम मकरंद पाटील यांनी साकारली. या आकर्षक रांगोळीमुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले असून समाजाला सकारात्मक व प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलादेशभक्तीपर गीत, शिवचरित्राचा पोवाडा आणि प्रभावी व्याख्यानांनी संमेलन रंगले

Source: जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील
Via: Kevil
Previous Post

जागतिक महिला दिनानिमित्त दारफळ सीना येथे मा. सौ. सोनाली मनोज साठे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजन

Next Post

सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
149
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
23
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
33
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
8
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
87
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
17
Next Post

सफाई कामगारावर प्राणघातक हल्ला; पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In