मिरजतील गजबजलेला आणि नागरिकांची वर्दळ असलेला किल्ला भाग नेहमीच एक चर्चेचा विषय ठरला आहे. किल्ला भागामध्ये असणारी एक शिक्षण संस्था आणि तहसीलदार कार्यालय यामुळे तर महाराणा प्रताप चौक येथून किल्ला भागात जाणारा रस्त्यावर नेहमी ट्राफिक जाम ठरलेली आहे. त्यात शाळे समोरून तहसीलदार कार्यालय कडे जाणारा अरुंद रस्ता आणि त्यातकाही अनधिकृत खोक्याच्या अतिक्रमणामुळे या रस्त्यावर कायमच वाहतुकीची समस्या एक डोकेदुखी बनली आहे. वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या समस्ये वर प्रशासनाची गांधारीची भूमिका असतें. या रस्त्यावर शाळे समोरील ठराविक हातांच्या बोटा वर मोजण्यासारखी अधिकृत खोकी सोडली तर दहा ते पंधरा खोकी हि अतिक्रमित आहेत त्यात दुचाकी आणि चार चाकीच्या बेशिस्त पार्किंग मुळे तर या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरलेला असतो. तरी तहसीलदार आवारातील पार्किंग साठी मारलेल्या पट्ट्यामुळे थोडीफार नागरिकांना शिस्त लागली आहे मात्र बाहेरील रस्त्यावरील दुचाकी वाहनांच्या बेजबाबदार पार्किंग चा फटका येथील स्थानिक नागरिकांना बसतो आहे याकडे प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.



