रिसोड / प्रतिनिधी
वाढत्या उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रिसोड शहरातील पठाडे नगर भागात विठाई मायनॉरिटी बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ या अभियानांतर्गत १६ मार्च रोजी जनजागृती करण्यात आली.
यावेळी महिलांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगत नळांना तोट्या बसवण्याचे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन करण्यात आले. घरगुती वापरात नळ उघडे ठेवणे, अंगण किंवा वाहने धुण्यासाठी पाण्याचा अतिवापर करणे यामुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रतिष्ठानचे सदस्य जियाउर खान यांनी एका गृहिणीला प्रात्यक्षिक दाखवत पाणी हे केवळ संसाधन नसून जीवन आहे. आज पाणी वाचवले नाही तर पुढील पिढीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा संदेश दिला. तसेच सार्वजनिक व खासगी नळांना तोट्या
नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे सांगत नळाला तोटी लावा, पाणी वाचवा असा संदेश देण्यात आला. या जनजागृती मोहिमेचे नेतृत्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खंडारे यांनी केले. यावेळी त्यांनी पाणी बचतीची सुरुवात घरापासून करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत केला










