नेरूळ | प्रतिनिधी
राज्यात सर्व सेवा सुरळीत सुरू असल्याचा दावा Devendra Fadnavis यांनी केला असतानाच, प्रत्यक्षात गॅस वितरण व्यवस्थेतील अनागोंदी समोर येत आहे.
नेरूळ परिसरातील एका कुटुंबाला गेल्या चार दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळालेला नसून, घरात स्वयंपाक ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ ओढवली आहे. विशेष म्हणजे Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) कडून “आपण बुकिंग करू शकता” असा मेसेज मिळूनही प्रत्यक्षात बुकिंग होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सदर ग्राहकाने २४ तारखेपासून सातत्याने बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिस्टम बुकिंग स्वीकारत नाही. एजन्सीकडे विचारणा केली असता, “आम्ही काही करू शकत नाही” असे सांगत जबाबदारी झटकण्यात आली.
यामुळे कुटुंबातील लहान मुलांच्या जेवणाची गंभीर समस्या निर्माण झाली असून, “बाहेरून किती दिवस जेवण आणायचे?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे सरकारकडून सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. “फडणवीस म्हणतात ‘सर्व सुरळीत’… मग महाराष्ट्रात नागरिक उपाशी का?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषी यंत्रणांवर कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.







