माळशिरस : तालुक्यात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या तीव्र लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येविरोधात महावितरण कार्यालय, वेळापूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा खासदार Dhairyasheel Mohite Patil व आमदार Uttamrao Jankar यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत वीज कपातीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, व्यावसायिक कामकाज तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
सदर मोर्चासाठी नागरिकांनी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालय, वेळापूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती पै. दत्तात्रय (भैय्या) मगर यांनी केले आहे.






