परभणी (प्रतिनिधी) :
भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून त्याच्यामुळेच नागरिकांचे अधिकार अबाधित राहिले आहेत. त्यामुळे संविधानाचे रक्षण प्राणापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते Prof. Sheikh Mahemud यांनी केले.
तुळजाभवानी नगर, वांगी रोड येथील त्रिरत्न बौद्ध विहारात Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत सहावे पुष्प गुंफताना त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि वर्तमान परिस्थिती’ या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेरखाने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. परविन कनकुटे उपस्थित होते. या व्याख्यानमालेत संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.








