• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू; दररोज 1000 सुवासिनींना साडी-चोळी वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूरगड येथे विश्वशांतीसाठी अयुतचंडी महायाग सुरू; दररोज 1000 सुवासिनींना साडी-चोळी वाटप
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी :
चैत्र महिन्यानिमित्त श्री रेणुका माता मंदिर परिसरात विश्वशांती व जगाच्या कल्याणासाठी भव्य अयुतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा माहूरगड येथील मातृतीर्थ रोडवरील बालाजी मंगल कार्यालयात अत्यंत भक्तीमय वातावरणात सुरू आहे.

श्रीसदगुरु सखाराम महाराज, शंकराचार्य संकेश्वर पीठाधीश्वर यांच्या कृपाशीर्वादाने दि. ४ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत महायाग पार पडत आहे. या महायागात नवकुंडात्मक अयुतचंडी यागाद्वारे दररोज एक हजार चंडीपाठ असे एकूण दहा हजार पाठांचे पठण केले जात आहे.

RelatedPosts

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

२५१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत दशसहस्त्र पाठांतरानंतर सहस्त्र पाठांचे पठण आणि २१ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हवन सोहळा पार पडत असून, महाआरतीने कार्यक्रमाची सांगता केली जाते.

या महायागामध्ये सहस्रार्चन, कुंकू मार्जन, पुष्प, फल व द्रव्य अर्चन, हवन, तर्पण, मार्जन, ब्राह्मणभोजन तसेच नामसंकीर्तन व गायन-वादन सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदांचे पारायणही विविध राज्यांतून आलेल्या वेदपाठी ब्राह्मणांच्या उपस्थितीत सुरू आहे.

महायागाच्या यशस्वी आयोजनासाठी टिटवाळा (मुंबई) येथील शाम जोशी नियोजन पाहत असून, ब्रह्मवृंद व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीरामपूर येथील हरीश पैठणे गुरुजी पार पाडत आहेत. ग्रामाचार्य म्हणून रवींद्र कान्नव गुरुजी यांचेही सहकार्य लाभत आहे.

विशेष म्हणजे, या महायागादरम्यान श्री रेणुका माता मंदिर पायथ्याशी दररोज १००० सुवासिनींना साडी-चोळी व ओटी देऊन सन्मानित केले जात आहे. त्यामुळे या सोहळ्याला धार्मिकतेसोबतच सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

विश्वशांती आणि भगवती रेणुका मातेंची कृपा लाभावी या उद्देशाने आयोजित या महायागाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Tags: Jaykumar Adkine
Previous Post

खेड-आळंदी मतदारसंघात आमदार बाबाजी शेठ काळे यांची २४/७ हेल्पलाइन सेवा सुरू; नागरिकांच्या समस्या आता थेट मार्गी

Next Post

दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा

Related Posts

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

बुलढाण्यात ८ जून रोजी ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’; नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

May 24, 2026
0
पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

पिंपळगाव राजा येथे शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश; बूथ प्रमुखांची बैठक उत्साहात संपन्न

May 24, 2026
1
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जयश्री पाटील यांची नियुक्ती

May 24, 2026
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर उपजिल्हाध्यक्षपदी अशोकराव गायकवाड यांची नियुक्ती

May 24, 2026
0
वाशी हायवे ब्रिजवर धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी दुर्घटना टळली
ताज्या घडामोडी

वाशी हायवे ब्रिजवर धावत्या ट्रॅव्हल्स बसला भीषण आग; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी दुर्घटना टळली

May 24, 2026
4
३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
ताज्या घडामोडी

३९ लाख ७५ हजारांचे १३० चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नवी मुंबई गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

May 24, 2026
7
Next Post
दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा

दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

म्हसावद येथील मिलिंद अहिरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

म्हसावद येथील मिलिंद अहिरे यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ जाहीर

May 25, 2026
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

May 25, 2026
किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

किनवट येथे संदल (ऊर्स) उत्सव ३० मे पासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार

May 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In