.
नातेवाईकांकडून शोधाशोध, तपास सुरु.
ग्रामीण प्रतिनीधी
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील एक २० वर्षीय विवाहिता ही दि.८ एप्रिल रोजी आलेगाव येथुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आलेगाव येथील रहिवासी अंबादास दिलीप कोल्हे हे शेगाव संस्थानामध्ये सेवाधारी कामानिमित्त बाहेर गेले होते.दि.८ एप्रिल रोजी रात्री रंजना सोहम कोल्हे या त्यांच्या भावाच्या पत्नीला शेजारीच असणाऱ्या अंबादास कोल्हे यांच्या मुलाचा रडण्याचा आवाज आला त्यांनी तेथे जाउन पाहिले असता त्यांना देर अंबादास कोल्हे यांचा मुलगा रडत असताना दिसुन आला. देरानी अंजली अंबादास कोल्हे ही बराच वेळ शोधाशोध करून आढळून आली नाही.
याबाबत ची माहिती देरानी रंजना सोहम कोल्हे यांनी पोलिस स्टेशन ला दिलेल्या बेपत्ता तक्रारीमध्ये दिली आहे.
दरम्यान बेपत्ता अंजली अंबादास कोल्हे हिची नातेवाईकांकडून शोधाशोध चालु असुन पुढील तपास चान्नी पोलिसांकडून सुरु आहे.




