• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1


दि. 15 एप्रिल 2026 रोजी शक्तिपीठ मेळाव्याचे आयोजन
**आजरा:-प्रतिनिधी,
शक्तीपीठ महामार्ग हा आजरा तालुक्यातील १०ते ११ गावांच्या मधून जात असून शेतकऱ्यांच्या शेतीबरोबरच येथील पर्यावरण आणि सांस्कृतिक जीवनही उध्वस्त करणारे आहे. त्यामुळे शक्तीपीठच्या विरोधातील लढाईत आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले की,१५ एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आम.सतेज उर्फ बंटी पाटील,माजी आम. राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आजरा येथे शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे. हा मेळावा आपण सर्वजण मिळून यशस्वी करूया.
खरंतर शक्तीपीठ असे नाव देऊन लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. सरकारला शक्तीपीठाच्या नावाखाली भांडवलदार आणि बड्या व्यापाऱ्यांसाठी हा रस्ता बनवायचा आहे. केवळ अदानी आणि अंबानीचे हित डोळ्यासमोर ठेवून होणाऱ्या या रस्त्याला आमचा तीव्र विरोध आहे कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करू द्यायचा नाही असा निर्धार या मेळाव्यात होणार आहे.
मेळाव्याच्या तयारीसाठी गावोगावी बैठका सभा होत असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सभा बैठकांना मिळत आहे त्यामुळे हा मेळावा मोठ्या संख्येने यशस्वी होणार याची आम्हाला खात्री आहे.


खरंतर या रस्त्याची मागणी कोणत्याही शेतकऱ्याने केली नसल्याने हा रस्ता गरजेचा नाही. खरंतर या रस्त्याला अन्य पर्यायी अनेक रस्ते असताना देखील शक्तीपीठ चा अट्टाहास कशासाठी?असा आमचा सरकारला सवाल आहे.
शेती, पर्यावरण आणि इथली लोकाभिमुख संस्कृती वाचवण्यासाठी शक्तीपीठ लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. म्हणूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले की, देवाच्या आणि भक्तांच्या नावावर केवळ वेगळं वातावरण तयार करून हा शक्तिपीठ महामार्ग सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करण्याचे कारस्थान आहे. हरपवडे, येरंडोळ येथून चंदगड पर्यंत हा मार्ग जाणार आणि या पट्ट्यामध्ये बागायती शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील शेती उध्वस्त होऊन याचा परिणाम साखर कारखान्यावर होणार आहे. पर्यावरण रहावा, शेतकरी उध्वस्त होऊ नये, उद्योगपतींच्या अस्तित्वासाठी निर्माण करीत असलेला हा शक्तिपीठ हाणून पडायचा म्हणून गावागावातल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून हा मेळावा घेणार आहोत.


प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की, पात्रादेवी हे काय मोठे देवस्थान नाही सुधारित शक्तिपीठाचे नवीन मार्ग येतोय आणि त्यामधून आजरा, राधानगरी आणि चंदगड या तालुक्यातील अतिशय निसर्ग संपन्न शेती बाधित होणार यासाठी याला विरोध करणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांना आत येता जाता येत नाही एवढे मोठे भराव आहेत. भरावासाठी मोठमोठे डोंगर भुईसपाट केले जात आहेत निसर्गातील जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे. माझं घर एका बाजूला आणि शेती एका बाजूला अशी विचित्र परिस्थिती होणार आहे. त्याच्यामुळे शेती आणि पर्यावरण धोक्यात येणार आहे. दोन्ही समितीनी सांगितले आहे की, जैवीक विविधता टिकली पाहिजे, पशु पक्षी जगले पाहिजे. कागलचा भाग वगळला परंतु राधानगरीचा निसर्गसंपन्न भाग या शक्तिपीठामध्ये भरडला जाणार आहे. विरोध हे लोकशाहीमधले फार मोठे हत्यार आहे. ज्यावेळी जनता विरोध करते, लोकं रस्त्यावर उतरतात त्यावेळी सरकारला याची नोंद घ्यावी लागते. ना फायदा होणार ना रोजगार मिळणार मग या शक्तिपिठाचा अट्टाहास कशासाठी? येत्या 15 तारखेला मेळावा घेणार आहोत या मेळाव्याला लोकांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी सर्वांनी काम करावे.
यावेळी कॉ. संजय तर्डेकर, उबाठाचे युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे,कॉ. प्रकाश मोरूस्कर, युवराज जाधव, संजयभाऊ सावंत, कृष्णा सावंत, रवींद्र भाटले आदिजण उपस्थित होते.

Previous Post

सोलर लावा म्हणणारेच आता लुटतायत?’महावितरणच्या दरधोरणावर ग्राहक संतप्तसोलर लावा म्हणणारेच आता लुटतायत?’

Next Post

आजऱ्यात ‘विराट हिंदू संमेलना’चा जागर; १२ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि धर्मसभा

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

आजऱ्यात 'विराट हिंदू संमेलना'चा जागर; १२ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आणि धर्मसभा

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In