• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भाऊसाहेब शिंदे न कडून सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

भाऊसाहेब शिंदे अपक्ष लढण्यावर ठाम,सरकारची डोकेदुखी वाढणार

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मुंबई : रामोशी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि हक्काच्या प्रतिनिधित्वसाठी आता निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. रामोशी समाजाचे शिलेदार डॉ.भाऊसाहेब शिंदे यांनी आपल्या शांत पण ठाम भूमिकेतून राज्याच्या राजकारणात एक वेगळी दिशा निर्माण केली आहे. विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्याचा शब्द राज्यातील एका बड्या नेत्यांनी दिल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी कडून रामोशी समाजाला संधी मिळण्याबाबत अजूनही स्पष्टता नसल्यामुळे समाजात नाराजीची भावना निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.भाऊसाहेब शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

मुंबईत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री दादा भुसे, सुप्रिया सुळे, प्रसाद लाड, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असून या भेटीत समाजाच्या विविध प्रश्नावली विशेषतः राजकीय प्रतिनिधीत्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळते. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे संकेत दिल्याचे समजते. डॉ.भाऊसाहेब शिंदे यांचेही धडपड केवळ वैयक्तिक राजकारणासाठी नसून संपूर्ण रामोशी समाजासाठी स्वाभिमानासाठी आहे. अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या समाजाला आता मुख्य प्रवाहात स्थान मिळावे ही त्यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही एका पक्षावर अवलंबून न राहता सर्वपक्षीय संवाद साधनेचा मार्ग स्वीकारला आहे. जर कोणत्याही पक्षाकडून योग्य संधी मिळाली नाही तर वेळप्रसंगी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही भूमिका त्यांच्या आत्मविश्वासची आणि समाजाच्या पाठबळाची जाणीव करून देणारी आहे.

मुंबईत सुरू असलेल्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी मधून एक स्पष्ट संदेश जात आहे. रामोशी समाज आता आपल्या हक्कासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. आगामी काळात ही चळवळ अधिक तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहेत. डॉ. भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाज एकवटत असून राजकीय स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आता पहावे लागेल की राज्यातील राजकीय पक्ष या वास्तवाची कितपत दखल घेतात आणि रामोशी समाजाला न्याय देण्यासाठी कोण पुढाकार घेतो भाऊसाहेब शिंदे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते नसल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार काय मार्ग काढतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

Previous Post

केंदूर पऱ्हाडवाडी येथे भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

रणसिंग महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

रणसिंग महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In