भाऊसाहेब शिंदे अपक्ष लढण्यावर ठाम,सरकारची डोकेदुखी वाढणार
मुंबई : रामोशी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि हक्काच्या प्रतिनिधित्वसाठी आता निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. रामोशी समाजाचे शिलेदार डॉ.भाऊसाहेब शिंदे यांनी आपल्या शांत पण ठाम भूमिकेतून राज्याच्या राजकारणात एक वेगळी दिशा निर्माण केली आहे. विधान परिषदेसाठी त्यांना संधी देण्याचा शब्द राज्यातील एका बड्या नेत्यांनी दिल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी कडून रामोशी समाजाला संधी मिळण्याबाबत अजूनही स्पष्टता नसल्यामुळे समाजात नाराजीची भावना निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.भाऊसाहेब शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
मुंबईत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री दादा भुसे, सुप्रिया सुळे, प्रसाद लाड, विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , यांच्या सह अनेक सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या असून या भेटीत समाजाच्या विविध प्रश्नावली विशेषतः राजकीय प्रतिनिधीत्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती मिळते. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे संकेत दिल्याचे समजते. डॉ.भाऊसाहेब शिंदे यांचेही धडपड केवळ वैयक्तिक राजकारणासाठी नसून संपूर्ण रामोशी समाजासाठी स्वाभिमानासाठी आहे. अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या या समाजाला आता मुख्य प्रवाहात स्थान मिळावे ही त्यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे त्यांनी कोणत्याही एका पक्षावर अवलंबून न राहता सर्वपक्षीय संवाद साधनेचा मार्ग स्वीकारला आहे. जर कोणत्याही पक्षाकडून योग्य संधी मिळाली नाही तर वेळप्रसंगी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही भूमिका त्यांच्या आत्मविश्वासची आणि समाजाच्या पाठबळाची जाणीव करून देणारी आहे.
मुंबईत सुरू असलेल्या विविध नेत्यांच्या भेटीगाठी मधून एक स्पष्ट संदेश जात आहे. रामोशी समाज आता आपल्या हक्कासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. आगामी काळात ही चळवळ अधिक तीव्र होण्याचे चिन्ह दिसत आहेत. डॉ. भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रामोशी समाज एकवटत असून राजकीय स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आता पहावे लागेल की राज्यातील राजकीय पक्ष या वास्तवाची कितपत दखल घेतात आणि रामोशी समाजाला न्याय देण्यासाठी कोण पुढाकार घेतो भाऊसाहेब शिंदे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते नसल्याने सरकारची डोकेदुखी वाढणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार काय मार्ग काढतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे
